Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यु

रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात, चार जणांचा जागीच मृत्यु
, सोमवार, 13 सप्टेंबर 2021 (08:40 IST)
ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ मधील पालेगाव या ठिकाणी रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व या आपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाल्याचे माहीती समोर येत आहे.
 
अंबरनाथ एमआयडीसी रोडवर एका भरघाव वेगात असलेल्या गाडीने रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. व जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी नगर पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून. हे सर्व जण उल्हासनगर येथील असल्याचे  माहीती पोलिसांनी दिली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाऊस ....पाऊस ....पाऊस