Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयएसआयएस दहशतवाद दोन भारतीयांची सुखरूप सुटका

आयएसआयएस दहशतवाद दोन भारतीयांची सुखरूप सुटका
, गुरूवार, 15 सप्टेंबर 2016 (17:08 IST)
गेल्या वर्षी सुमारे  वर्षापूर्वी अपहरण झालेल्या दोन भारतीय शिक्षकाची सुटका लिबिया या देशातून करण्यात आली आहे.भारताच्या  विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी ही माहिती द्‌विटरवरून दिली आहे .यामध्ये अपहरण झालेले  टी गोपालकृष्ण (आंध्र प्रदेश) आणि सी बलरामकिशन (तेलंगना) यांचा समवेश  होता. लिबियामधील सिर्ते विद्यापीठात हे दोघे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी २९ जुलै २०१५ मध्ये त्यांचे अपहरण झाले होते. त्यांचे अपहरण ‘आयएसआयएस’च्या दहशतवाद्यांनी केले होते.
 
बलराम किशन यांच्या पत्नी श्रीदेवी किशन यांनी आपल्याला फार आनंद झाला असे सागितले त्यांनी भारत सरकार आणि सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत.तर सी बलरामकिशन यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरमालकाची विजचोरी गेला भाडेकरूचा जीव