बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यात रेल्वे एक्सप्रेसने टेम्पोला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मोतीहारीमधील एका रेल्वे गेटवर हा अपघात घडला. रेल्वे क्रॉसिंगवर गेटमन उपस्थित नव्हता. यामुळे हा भीषण अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, सेमरा-सुगौली रेल्वे मार्गावरील एका रेल्वे क्रॉसिंगवर टेम्पो रुळ ओलांडत असताना मुझफ्फरपूरहून देहरादून जाणारी राप्ती-गंगा एक्स्प्रेसने रिक्षाला जोरात धडक दिली. रिक्षा चक्नाचूर झाला तर रिक्षातील 18 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी टेम्पोचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले.
प्रत्येक मृतांच्या वारसांना रेल्वे प्रशासनाने 50-50 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारनेही मृतांच्या कुटूंबियांना दीड-दीड लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याशिवाय जखमींना पाच- पाच हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.