Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एफटीआयच्या महाभारतात राहुल गांधींची ‘एन्ट्री’

एफटीआयच्या महाभारतात राहुल गांधींची ‘एन्ट्री’
पुणे , शनिवार, 1 ऑगस्ट 2015 (14:07 IST)
सरकारकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  विचार  लादले जात आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात टीका केली.

एफटीआयआयच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी येथे आले होते. सरकारने वेळीच तोडगा न काढल्यास विद्यार्थ्यांचा आवाज संसदेत उठविला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

ते म्हणाले, आरएसएसची विचारसरणी सध्या सगळ्या शैक्षणिक संस्थावर लादली जात आहे. चौहान यांच्यासाठी मोदीच आग्रही आहेत. त्यामुळे त्यांचा हा आदेश डावल्याची हिंमत कोणीही दाखवत नाही. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून स्वत:चे विचार त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi