Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

...तर पाकमध्ये जा

...तर पाकमध्ये जा
गुवाहाटी , सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (10:52 IST)
भारतीय मुस्लीम पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी मोकळे आहेत, असे वादग्रस्त विधान आसामचे राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
 
शनिवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना आचार्य यांनी ह्यहिंदुस्तानात फक्त हिंदूच राहू शकतातह्ण असे वक्तव्य केले होते. रविवारी त्यावर स्पष्टीकरण देतानाही त्यांनी दुसरे वादग्रस्त वक्तव्य करून वाद अधिक चिघळविला. ह्यदेशात आपला छळ होतो आहे असे ज्यांना वाटते ते भारतीय मुस्लीम कुठेही जाण्यास मोकळे आहेत. पाकिस्तान अथवा बांगला देशात जाण्याची त्यांची इच्छा असेल तर ते तेथे जाण्यास मोकळे आहेत.
 
त्यांच्यापैकी बरेच पाकिस्तानमध्ये गेले आहेत, असे आचार्य म्हणाले. दरम्यान,  आचार्य यांना राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, अशी जोरदार मागणी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi