Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दहशतवादी नावमध्ये आले होते- विलासराव देशमुख

दहशतवादी नावमध्ये आले होते- विलासराव देशमुख

भाषा

मुंबई , शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2008 (00:59 IST)
मुंबईत दहशत निर्माण करणारे दहशतवादी समुद्रीमार्गे नावेने मुंबईत पोहचल्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सांगितले. त्यांनी दहा ठिकाणी हल्ला केला असून त्यांची संख्या नक्की सांगता येणार नाही.

यावेळी झालेल्या चकमकीत सात अतिरेक्यांना कंठस्नान दिले असून नऊ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ही माहिती देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या हल्ल्याची सुरवात बुधवारी रात्री नऊ वाजून 55 मिनिटाने झाली होती. नावेने आलेल्या या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करत ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्ये दबा धरला आहे. त्यांची संख्या किती आहेत? हे मात्र अजून समजू शकले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi