Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिथलेल्या पाकने भारताला दिली धमकी

बिथलेल्या पाकने भारताला दिली धमकी
, सोमवार, 31 ऑगस्ट 2015 (11:26 IST)
इस्लामाबाद- काश्मीरमध्ये जीवंत दहशतवाद्यांना भारताने पकडल्यानंतर पितळ उघडे पडलेल्या पाकिस्तानने कांगावा सुरु केला असून आमच्याविरुध्द युद्ध पुकारल्यास याचे महाभयंकर परिणाम भोगावे लागतील, अशी धकमी पाकने भारताला दिली आहे.
 
भारताने पाकिस्तानवर युद्ध लादण्याचा प्रयत्न केले, तर त्याचे मोठे परिणाम भारताला सहन करावे लागतील आणि अनेक दशके याच्या झळा सोसाव्या लागतील. भारताच्या सुरक्षादलाकडून होत असलेल्या छुप्या कारवायांमुळे आम्ही सुरक्षाव्यवस्था चोख केली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणे आणि सीमेवर गोळीबार करून तणाव निर्माण करण्याचा भारताचा खरा चेहरा उघड झाला आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi