Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप सरकार शेतकरीविरोधी : राहुल

भाजप सरकार शेतकरीविरोधी : राहुल
अमरावती , शुक्रवार, 1 मे 2015 (10:21 IST)
विदर्भात मी यापूर्वीही आलो होतो, परंतु अशी परिस्थिती यापूर्वी मी कधीही पाहिली नाही. येथील शेतकर्‍यांची स्थिती चिंताजनक आहे, अशी खंत व्यक्त करतानाच भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
 
विदर्भातील शेतकर्‍यांशी संवाद साधताना पदयात्रा पूर्ण करून राहुल गांधी यांनी तोंगलाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस कार्यकर्त्यांते राहुल यांनी आभार मानले. ‘संसदेत कृषिमंर्त्यांनी केवळ तीन आत्महत्या झाल्याचा खोटा दावा केला. तसेच हरियाणामधील कृषिमंत्र्यांनी आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांना  भेकड म्हटले. हे शेतकरी व कष्टकर्‍यांचे सरकार नाही, तर फक्त काही निवडक उद्योगपतींचे सरकार आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi