Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतापेक्षा जास्त कुठलेही देश तुझ्यसाठी सुरक्षित नाही : तस्लीमा

भारतापेक्षा जास्त कुठलेही देश तुझ्यसाठी सुरक्षित नाही : तस्लीमा
नवी दिल्ली , बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (12:55 IST)
देशातील वाढत्या असहिष्णुतेमुळे पत्नी किरणने देश सोडून जाण्याचा वातावरणात बॉलीवूडचे सुपरस्टार आमिर खानच्या विधानावर विवाद सुरू झाला आहे. बीजेपी आणि मोदी यांचे मंत्री आमिर खानच्या विरुद्ध बयानबाजी करत आहे तसेच सोशल मीडियावर देखील आमिरला टीकेचा सामना करावा लागत आहे.  
 
आता या प्रकरणात विवादास्पद बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी देखील ट्विट केले आहे. तस्लीमाने ट्विट करत म्हटले आहे की, ''असहिष्णुता जगात कमी किंवा जास्त प्रमाणात प्रत्येक देशात आहे. आमिर खान सारख्या सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी  भारत सर्वात जास्त सुरक्षित जागा आहे.''
 
महत्त्वाचे म्हणजे आमिर खानचस चित्रपट पीके बघितल्यानंतर तस्लीमाने ट्विट केले होते की, ''पीके सारखे चित्रपट तयार करून तू 300 कोटी कमावले आहे. आमिर हेच चित्रपट जर तू पाकिस्तानी आणि बांगलादेशामध्ये तयार केली असती तर तुझी अंत्यविधी करण्यात आली असती.''

Share this Story:

Follow Webdunia marathi