Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मोदी सरकारचा हात

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना मोदी सरकारचा हात
दिल्ली , बुधवार, 25 मार्च 2015 (10:14 IST)
अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केंद्र सरकारने दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपल्याने केंद्र सरकारकडे राज्य सरकारने मदत मागितली होती. याबाबत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर केंद्राने मदत जाहीर केली.
 
पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे. या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, कृषी मंत्री राधामोहन सिंह आदी उच्चस्तरीय नेते या बैठकीला उपस्थित होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi