Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मान्सून ‘कधी रे येशील तू...’

मान्सून ‘कधी रे येशील तू...’
दिल्ली , गुरूवार, 28 मे 2015 (10:42 IST)
वाढता वाढता वाढे म्हणत राज्यातील तापमान ४५ अंशावर गेले आहे. उष्णतेच्या लाटेत देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या १ हजारावर पोहोचली आहे. अंदमान येथे दाखल झालेला मान्सून कधी बसणार आणि उकाड्यापासून मुक्ती मिळणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

यंदा राज्यातील सर्वच शहरांमध्ये सरासरीपेक्षा पारा जास्त आहे. म्हणूनच यंदा उकाडा जास्त असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. असह्य करणारा उखाडा सुसह्य करण्यासाठी नानाविध उपाय केले जात असले तरी ते तोकडे पडत असल्याने आता पावसाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. मात्र, गारवा देणारा मान्सूपूर्व पावसाचाही अद्याप पत्ता नसल्याने मान्सून ‘कधी रे येशील तू...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi