Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबापुरीला आता कोयना धरणाचा आधार

मुंबापुरीला आता कोयना धरणाचा आधार
दिल्ली , बुधवार, 16 सप्टेंबर 2015 (11:26 IST)
वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीमार्गे थेट समुद्रात मिसळून नाश पावणारे पाणी मुंबापुरीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोयना धरणातून थेट समुद्रात वाया जाणार्‍या ६७.५ टीएमसी पाण्याचा लाभ मुंबई आणि परिसराला नजीकच्या भविष्यात मिळणार आहे.

वीजनिर्मितीनंतर वाया जाणारे पाणी ठाणे, कल्याण, डोंबिवली, सिडको व कोकणातील वाटेवरच्या गावांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याच्या तब्बल सव्वादोन हजार कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी मंगळवारी तत्त्वत: मान्यता दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi