भारताच्या मेक इन इंडिया प्रकल्पाच्या प्रमोशनकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यरात्री भारतात परतले. चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया असा सहा दिवसांचा दौरा आटोपून मायदेशी परतलेल्या मोदींचे येथील विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.
या दौर्यामुळे परस्पर देशांमधील गुंतवणूक तर वाढेलच, पण त्याचबरोबर चीनलगतच्या सीमाभागामध्ये शांतता निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या तिन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांशी संवाद साधला. याचा मोठा फायदा आर्थिक प्रगतीस होईल, असाही अंदाज आहे.