Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका वर्षात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

एका वर्षात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये 18 टक्क्यांनी वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या
, शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (17:13 IST)
देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बातमी समोर आली आहे. एनसीआरबीच्या अहवालावर नजर टाकली तर शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने गुरुवारी ही माहिती दिली. राज्यनिहाय विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. येथे शेतीशी संबंधित 4006 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.
 
या क्रमवारीत 2016 मध्ये कर्नाटकात 889, आंध्र प्रदेशात 735, मध्य प्रदेशात 735, छत्तीसगडमध्ये 537 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये एकूण 10,677 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2019 मध्ये देखील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश आत्महत्यांच्या बाबतीत पहिल्या 4 मध्ये होते. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जमीन नसलेल्या आणि शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही.
 
2020 मध्ये कृषी क्षेत्रात एकूण 10,677 लोकांनी आत्महत्या केल्या, जे देशातील एकूण आत्महत्या प्रकरणांच्या (1,53,052) 7 टक्के आहे. 10,677 आत्महत्या प्रकरणांपैकी 5579 शेतकरी आणि 5098 शेतमजुरांच्या घटना आहेत.सन 2016 मध्ये अशा 11,379 आत्महत्या झाल्या. 2017 मध्ये 10,655, 2018 मध्ये 10,349 आणि 2019 मध्ये 10,281 प्रकरणे नोंदवली गेली.
 
2019 आणि 2020 ची तुलना केली तर 2019 मध्ये 5957 शेतकरी आणि 4324 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आणि 2020 मध्ये 5579 शेतकरी आणि 5098 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. म्हणजेच 2020 मध्ये शेतमजुरांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2020 मध्ये आत्महत्या केलेल्या 5579 शेतकऱ्यांपैकी 5335 पुरुष आणि 244 महिला होत्या. त्याचवेळी, यावर्षी आत्महत्या केलेल्या 5098 शेतमजुरांपैकी 4621 पुरुष आणि 477 महिला होत्या. पंजाब आणि हरियाणामध्ये 257 आणि 280 आत्महत्यांची नोंद झाली आहे. पश्चिम बंगाल, बिहार, नागालँड, त्रिपुरा, उत्तराखंड, चंदीगड, दिल्ली, लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये आत्महत्या झाल्याची शून्य नोंद आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी "24 कॅरेटचे सोने" आहेत, त्यांच्यावर कॉलेजमध्ये अभ्यास व्हायला हवा; राजनाथ सिंह यांनी केले कौतुक