Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tamil Nadu Rains: तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळले, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

Tamil Nadu Rains: तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळले, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू
, शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (16:11 IST)
तामिळनाडूच्या विविध भागात मुसळधार पावसाने कहर सुरूच आहे. शुक्रवारी राज्यातील वेल्लोर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एक घर कोसळले . या अपघातात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश आहे. त्याचवेळी या अपघातात काही लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. यासोबतच या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये पावसामुळे घर कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही असे अपघात झाल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 10 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.
 
राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत, शेतात पाणी आले आहे, झाडे व पिके जमीनदोस्त झाली आहेत. एका आकडेवारीनुसार, अतिवृष्टीमुळे 1 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडूमध्ये यावेळी सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या चालू ईशान्य मान्सूनमध्ये राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ६१ टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्याचवेळी उत्तर तामिळनाडूच्या जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे.
 
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-पश्चिमेकडे सरकले आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे . 19 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 ते 4 च्या दरम्यान याने पुद्दुचेरी आणि चेन्नई दरम्यान उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या लगतच्या किनार्या  ओलांडल्या. त्याच वेळी, चेन्नई आणि तामिळनाडूच्या इतर उत्तरेकडील भागात अतिवृष्टीमुळे 14 जणांचा मृत्यू झाला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रेयसी सासूनं प्रियकर जावयाची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या केली