Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 7 March 2025
webdunia

दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून होणार सुटका, सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावणे बंधनकारक

दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधातून होणार सुटका, सामाजिक अंतर राखणे आणि मास्क लावणे बंधनकारक
, बुधवार, 23 मार्च 2022 (14:56 IST)
देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने महामारी रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. 31मार्चपासून कोरोना निर्बंध संपणार आहेत. दोन वर्षांनंतर देशातील जनतेची या निर्बंधातून सुटका झाली. आता फक्त सामाजिक अंतर राखावे लागणार असून मास्क चा वापर करणे बंधनकारक आहे. 
 
केंद्र सरकारने  24 मार्च 2020 रोजी प्रथमच कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानंतर अनेक वेळा या मार्गदर्शक तत्त्वात बदल केंद्र आले.
 
केंद्र आणि राज्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आतापर्यंत देशवासियांना अँटी-कोविड लसींचे 181.56 कोटी डोस देण्यात आले आहेत,
 
विद्यमान आदेशाची मुदत 31 मार्च रोजी संपल्यानंतर गृह मंत्रालयाकडून कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत. तथापि, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेस मास्क आणि हात धुण्यासह सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला दिला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता पुणे विभागातील रेशन दुकान होणार 'डिजिटल'