Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर केजरीवाल यांनी पराभव स्विकारला

अखेर केजरीवाल यांनी पराभव स्विकारला
अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र शेअर करत दिल्ली, पंजाब आणि गोवा निवडणुकीत आम्ही चुकलो सांगत पराभव स्विकारला आहे. 'गेल्या दोन दिवसांत मी अनेक स्वयंसेवक आणि मतदारांशी बातचीत केली. आम्ही अनेक चुका केल्या हे वास्तव आहे. आमच्या चुकांचं आत्मपरिक्षण करुन त्या गोष्टी सुधरवण्याचा प्रयत्न करु', असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत.

केजरीवाल यांनी लिहिलं आहे की, 'आमच्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे. हे बोलणं गरजेचं आहे. आम्हाला चिंतन केलं पाहिजे. बहाण्यांची नाही तर अॅक्शन घेण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलं पाहिजे. आम्ही अनेकवेळा घसरलो असून स्वत:ला ओळखून पुन्हा उभं राहणं महत्वाचं आहे'. दिल्ली महापालिकेतील पराभवामुळे सरकारच्या कामावर काहीच प्रभाव पडणार नाही असा विश्वास केजरीवाल यांनी जनतेला दिला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सहा महिन्याच्या चिमुरडीला सलमान खानची मदत