Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरविंद केजरीवाल : पक्ष चोरला, नाव चोरलं पण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या मागे

arvind uddhav
, शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (08:07 IST)
Twitter
उद्धव ठाकरेंच्या पक्षाची चोरी झाली, त्यांच्या चिन्हाची आणि नावाची चोरी झाली, पण बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते, आणि उद्धव ठाकरे हे त्या वाघाचे सुपुत्र आहेत, त्यामुळे महाराष्ट्र त्यांच्या मागे असल्याचं मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं.
 
सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना भेटीचं निमंत्रण दिलं होतं. या भेटीवेळी अरविंद केजरीवाल यांनी हे मत व्यक्त केलं.
 
ईडी आणि सीबीआयचा वापर हे भित्रे लोक करतात. भाजपवाले ज्या लोकांना घाबरतात त्यांच्याविरोधात या तपास यंत्रणांचा वापर केला जातोय. आम्ही काही केलं नाही, त्यामुळे आम्ही घाबरत नाही, शेवटी सत्याचाच विजय होणार असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
 
कोरोना काळात उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या प्रकारे काम केलं ते कौतुकास्पद आहे. कोरोना काळात महाराष्ट्र आणि मुंबईतील अनेक कामांची दिल्लीमध्ये आम्ही अंमलबजावणी केली असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्ली : आनंद पर्वत परिसरात भीषण अपघात