Publish Date: Sat, 29 Jan 2022 (20:29 IST)
Updated Date: Wed, 28 Sep 2022 (13:53 IST)
झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री गीताश्री ओराव यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, झारखंडच्या जनभावनेनुसार राज्यात सरकार आणि संघटना काम करत नाही. म्हणूनच मी जड अंत:करणाने राजीनामा देत आहे. हे पत्र त्यांनी प्रदेश काँग्रेसचे नवे प्रभारी अविनाश पांडे यांना सुपूर्द केले आहे.
सांगायचे झाले तर गीताश्री ओराँव कार्तिक ओराँची मुलगी आहे. त्या सिसाई विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्या राज्याच्या माजी शिक्षणमंत्रीही होत्या.