Publish Date: Mon, 07 Nov 2016 (09:45 IST)
Updated Date: Mon, 07 Nov 2016 (09:48 IST)
भारताने जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या महिला जवानांना तैनात केले आहे. या जवान आरएस पुरा सेक्टरसोबतच अखनूर, अरनियासारख्या संवेदनशील ठिकाणांवर तैनात आहेत. सुमारे १९२ किलोमीटरवर या ९० महिला जवान हातामध्ये ५.६ एमएम रायफल घेऊन सीमेवर गस्त घालत आहेत. दररोज ६ ते ८ तास देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.