Publish Date: Sun, 10 Nov 2024 (12:16 IST)
Updated Date: Sun, 10 Nov 2024 (12:22 IST)
सध्या तेलंगणा सरकार राज्यात बहुप्रतीक्षित जात आधारित सर्वेक्षण करत असून राहुल गाँधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आणि म्हणाले, या तून मिळालेल्या आकड़ेवारीचा वापर करू.
राज्यातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी धोरणे बनवणार आणि लवकरच त्याची अमलबजावणी महाराष्ट्रात करणार.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निवडणूक आश्वासनानुसार, तेलंगणा सरकारने 6 नोव्हेंबर रोजी सर्वसमावेशक सामाजिक-आर्थिक, रोजगार, राजकीय आणि जाती निहाय सर्वेक्षण सुरु केले. या संदर्भात राहुल गाँधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केले आहे. हे महाराष्ट्रात लवकर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
ते पुढे लिहितात की भाजपला देशात सर्वसमावेशक जाती निहाय जनगणना करायची नहीं हे सर्वांना महित आहे. मी मोदीजींना सांगू इच्छितो की कही ही केले तरीही तुम्ही देशभरात होती निहाय जनगणना थांबवू शकणार नहीं.
आम्ही याच संसदेत जात जनगणना पार पाडू आणि आरक्षणाची 50% भिंत तोडू."
राज्याचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शनिवारी सांगितले की, राज्याने जात सर्वेक्षणाच्या प्रगणनेला सुरुवात करून क्रांतिकारी प्रवास सुरू केला आहे. हा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल आणि आगामी काळात सामाजिक न्यायासाठी पुढाकार आणि धोरणांमध्ये राज्य भारतात अव्वल स्थानावर राहावे यासाठी सरकार कठोर परिश्रम घेईल.