भारतीय जवान चंदू चव्हाण पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला अखेर आपल्या घरी धुळ्यात परतणार आहे. चंदूला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे स्वतः घेऊन धुळ्यात आणणार आहेत. संपूर्ण ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण आहे.
नजरचुकीनं पाकिस्तानच्या हद्दीत 29 सप्टेंबरला गेलेला चंदू चव्हाणची 21 जानेवारीला पाकिस्ताननं सुटका केली होती. भारतात परतल्यानंतर चंदूला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यादरम्यान, त्याच्यावर उपचारही सुरु होते. अखेर चंदू उद्या आपल्या गावी परतणार आहे. त्यामुळे आता त्याचे आई बाबा आणि गावातील लोकांनी त्याचे जंगी स्वागत करणार आहेत.