Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीएम चंद्राबाबू नायडूंचा मोठा आरोप, "तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेली"

सीएम चंद्राबाबू नायडूंचा मोठा आरोप,
, गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (10:00 IST)
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी धक्कादायक दावा करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बुधवारी मागील वायएसआर काँग्रेस सरकारवर आपल्या कार्यकाळात प्रसिद्ध तिरुपती मंदिरात लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला. तसेच चंद्राबाबू नायडू म्हणाले की, जगन प्रशासनाने तिरुपती प्रसादात तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचे जाणून आश्चर्य वाटले. करोडो भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करू शकलेल्यांना लाज वाटली पाहिजे.
 
तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात तिरुपती लाडू अर्पण केले जातात. तसेच मंदिर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे प्रशासित आहे. चंद्राबाबू नायडू यांनी एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना हा दावा केला. मुख्यमंत्री नायडू म्हणाले की, आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे, त्यामुळे गुणवत्ता सुधारली आहे.
 
तसेच त्याचवेळी चंद्राबाबू नायडूंच्या या आरोपांवर वायएसआर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांनी नायडूंवर तिरुपती मंदिराच्या पावित्र्याला हानी पोहोचवल्याचा आरोप केला.  
 
तसेच ते म्हणाले की, "राजकीय फायद्यासाठी चंद्राबाबू नायडू कोणत्याही थराला जाऊ शकतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी माझ्या कुटुंबासह देवासमोर तिरुमला 'प्रसाद' घेण्यास तयार आहे. चंद्राबाबू नायडू आपल्या कुटुंबासोबत असे करण्यास तयार आहे का?

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधींबद्दल अपशब्द उच्चारले, भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल