Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, दूध, भाजीपाल्याची टंचाई

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, दूध, भाजीपाल्याची टंचाई
, शुक्रवार, 2 जून 2017 (11:35 IST)

राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. शहरांची नाकाबंदी करुन आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजपासून अनेक शहरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याची टंचाई निर्माण झाली आहे. नवी मुंबईत जिथे दररोज 500 गाड्यांची आवक होते, तिथे आज फक्त दीडशे गाड्यांची आवक झाली आहे. तर कल्याणमध्ये सकाळपासून भाजीचा एकही ट्रक आलेला नाही. त्यामुळे कल्याणमधील व्यापारी कालच्याच उरलेल्या भाज्या विकत आहेत. याशिवाय, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 10 टक्के आवक झाली आहे. बाजार समितीत फक्त 110 गाड्या आल्या आहे. तर ठाणे, मनमाड, येवला, लासलगावमध्येही भाजीपाल्याची गाडी आली नाही.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शेतकऱ्यांच्या संपामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू