Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समुद्रात भीषण अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या, 8 ते 10 जण बेपत्ता

समुद्रात भीषण अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या, 8 ते 10 जण बेपत्ता
, गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (12:21 IST)
गुजरातमधील गीर सोमनाथमध्ये काल रात्री सतत पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडण्याची भीती आहे. या बोटीत अनेक मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीतील 8 ते 10 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. कालपासून बिघडलेले हवामान पाहता, हवाई विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.

महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासून सतत पाऊस पडत आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासात येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांसाठी 5 दिवसांचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचवेळी ओडिशा आणि आंध्रवर ‘जवाड’ चक्रीवादळाची छाया पसरली आहे. अहमदाबादमध्ये आयएमडीच्या प्रादेशिक संचालक मनोरमा मोहंती म्हणाले होते की गुजरातमध्ये 30 नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. यासोबतच 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत उत्तर आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
या राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो
भारतीय हवामान विभागाने सांगितले की, 1 ते 2 डिसेंबर दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, आज 2 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मेघगर्जना/विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज