आपला देश एक खेळी करत चीनला धक्का देणार आहे. आपले एक उच्च श्रेनित असलेले अस्त्र आपणा एका देशला विकत असून त्यामुळे चीनला मोठा धक्का बसणार आहे.
चीनचा कट्टर विरोधी नेहमी असलेल्या व्हिएतनामला भारत ‘आकाश’ हे क्षेपणास्त्र विकणार आहे. तर व्हिएतनामच्या वैमानिकांना सुखोई या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण देण्याची तयारीही भारताने दर्शवली आहे. भारताविरोधात चीनच्या छुप्या कारवाया पाकिस्तानसोबतचे करार असो किंवा मसूद अझहरला दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न असो यात चीनची नेहमीच आडकाठी असते. पण आता भारतानेही चीनला शह देण्याची खेळी केली आहे. त्यामुळे भारताने मोठा धक्का चीनला दिला आहे. तर आपली ताकद किती आहे हे सुद्धा दाखवले आहे.