Publish Date: Fri, 17 Nov 2023 (12:22 IST)
Updated Date: Fri, 17 Nov 2023 (12:24 IST)
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच आहे. सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीच्या ठिकाणी पाच दहशतवादी मारले गेले आहेत. मारले गेलेले दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागात सुरक्षा दलांची कारवाई अजूनही सुरू आहे.
कुलगाम जिल्ह्यातील सामनू गावात गुरुवारी दुपारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. पोलीस, लष्कराच्या 34 आरआर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने एका विशिष्ट माहितीवरून कुलगामच्या सामनू गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. नाकाबंदी होत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावरून चकमक सुरू झाली. रात्री उशिरा गोळीबार थांबला.
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, चकमकीत पाच दहशतवादी मारले गेले आहेत. शोध मोहीम सुरू आहे.