Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

मन की बात: पंतप्रधान मोदींनी वाचले कॅप्टन वरुण सिंगचे पत्र, म्हणाले - त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली

मन की बात: पंतप्रधान मोदींनी वाचले कॅप्टन वरुण सिंगचे पत्र, म्हणाले - त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली
, रविवार, 26 डिसेंबर 2021 (12:44 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवारी मन की बात कार्यक्रमात संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी कोरोना महामारीपासून विद्यार्थ्यांसमोरील आव्हानांबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी तामिळनाडू हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचेही स्मरण केले. पीएम मोदी म्हणाले की, वरुण रुग्णालयात होते , त्यावेळी मी सोशल मीडियावर काहीतरी पाहिले, जे माझ्या हृदयाला भिडले. या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. या सन्मानानंतर त्यांनी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले. 
ते म्हणाले की, हे पत्र वाचून माझ्या मनात पहिला विचार आला की यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही ते मुळांना सिंचन करायला विसरले नाही.
 
वरुण सिंह यांना शौर्य चक्र मिळाल्या नंतर  18 सप्टेंबर रोजी चंडीमंदिर येथील आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना अनेक प्रेरणादायी गोष्टी लिहिल्या . वरुण सिंह यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटले होते की, मध्यम असण्यात काहीच गैर नाही. सर्व विद्यार्थ्यांना 90% गुण मिळू शकत नाहीत. होय, ज्यांना हे शक्य आहे त्यांचे कौतुक नक्कीच केले पाहिजे  
 
वरुणने या पत्रात विद्यार्थ्यांना पुढे सांगितले की, जर तुम्ही सरासरी दर्जाचे असाल तर आपण यासाठी बनवले आहात असा अजिबात विचार करू नका. तुम्ही शाळेत सरासरी आहात, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर सरासरी दर्जाचे राहाल. आपल्याला पुढे काय करायचे आहे ते मनाचे ऐका. ते कला, संगीत, साहित्य किंवा ग्राफिक डिझाइनमध्ये काहीही असू शकते. तुम्ही जे काही कराल ते चांगले करा आणि तुमचे सर्वोत्तम द्या.
 
त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ते  स्वत: फक्त एक सरासरी विद्यार्थी होते आणि खूप मेहनत करून त्याने बारावीत प्रथम श्रेणीचे गुण मिळवले आहेत. त्यांना विमान वाहतूक क्षेत्राची आवड होती आणि आज अशी वेळ आली आहे की त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य चक्र प्रदान केले जात आहे. वरुण सिंह यांनी 18 सप्टेंबर 2021 रोजी हे पत्र लिहिले होते.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रात आजपासून नवे निर्बंध ,रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी