Publish Date: Fri, 23 Jan 2026 (09:36 IST)
Updated Date: Fri, 23 Jan 2026 (09:41 IST)
तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका ढाब्यावर विष देऊन किमान १५ माकडांचा मृत्यू झाला, तर सुमारे ८० माकडांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत माकडांचे मृतदेह आजूबाजूच्या परिसरात विखुरलेले आढळले. ही हृदयद्रावक परिस्थिती पाहून ग्रामस्थांनी तात्काळ गावप्रमुख आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती दिली.