Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र सीमेवर शहीद

ऐन दिवाळीत महाराष्ट्राचे दोन सुपुत्र सीमेवर शहीद
, सोमवार, 16 नोव्हेंबर 2020 (15:01 IST)
पाकिस्तानच्या हल्ल्यात ऋषीकेश जोंधळे शहीद झाले आहे. ऋषीकेश जोंधळे हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. त्यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या बहिरेवाडी या मूळगावी शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप देण्यात आला. भाऊबीजेच्या दिवशीच ऋषीकेश जोंधळे यांच्या चितेला त्यांच्या चुलत भावाने अग्नी दिला. या वीराला निरोप देताना संपूर्ण गाव अश्रूंच्या शोकसागरात बुडालं.
 
जम्मू काश्मीर मधील उरी सेक्टर आणि गुरेज सेक्टर दरम्यान शुक्रवारी अनेक ठिकाणी युद्धबंदी कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केले. या गोळीबारात भारताचे पाच जवान शहीद झाले तर तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी या गावाचे सुपुत्र ऋषीकेश जोंधळे आणि नागपूर जिल्ह्यातील अंबाडा सोनक गावातील भूषण सतई शहीद झाले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या वर्षीच्या तुलनेत 2021 अधिक बिघडण्याची शक्यता आहे, असा इशारा यूएन एजन्सीने दिला आहे