Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा- ममता बॅनर्जी

Mamta Banerjee
लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीनं चांगली कामगिरी केल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, “एका बाजूला सीबीआय, एका बाजूला ईडी असूनही मोदींना पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे. त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. कारण त्यांनी 400 पारची घोषणा केली होती. आता त्यांना टीडीपी आणि नितीश कुमार यांचे पाय धरायचे आहेत. मी मोदींना चांगली ओळखते. ते इंडिया आघाडीला तोडू शकणार नाहीत.”
 
त्या म्हणाल्या, “मी अखिलेश यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. येत्या निवडणुकांत उत्तर प्रदेशात अखिलेश यांचा विजय होईल. बिहारमधील निकाल अजून समोर आलेले नाहीत, ते खरे नाहीत. माझं तेजस्वी यादव यांच्याशी बोलणं झालं. ते म्हणाले, दीदी अजून भरपूर मतमोजणी बाकी आहे. हे खोटं बोलत आहेत.”

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मंगळसूत्र'वर भारी 'बलिदान', UP मध्ये प्रियंका गांधींच्या रणनीतीमुळे भाजपचा बालेकिल्ला ढासळला