Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंधू नदी पाणी वाटप कराराबैठकीसाठी भारत उपस्थिती लावणार

सिंधू नदी पाणी वाटप कराराबैठकीसाठी भारत उपस्थिती लावणार
, शुक्रवार, 3 मार्च 2017 (17:05 IST)
मार्च महिन्यात लाहोरमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सिंधू नदी पाणी वाटप करारासंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी भारत उपस्थिती लावणार आहे. या संदर्भात भारताला पाकिस्तानने निमंत्रण पाठवले आहे.करारानुसार बियास, रावी आणि सतलज या तीन पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारत विनाअट वापर करू शकतो. तर सिंधू, चिनाब आणि झेलम या तीन पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान प्राधान्याने वापरू शकतो. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी १९ सप्टेंबर १९६० रोजी सिंधू नदी पाणीवाटप करारावर स्वाक्षऱ्या केल्या. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार झाला. त्यात भारतातून पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या बियास, रावी, सतलज, सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाणीवाटपाची तरतूद करण्यात आली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्टीलरी सेंटरमध्ये रॉय मॅथ्यू या जवानानं आत्महत्या केली