Publish Date: Sun, 05 May 2024 (13:13 IST)
Updated Date: Sun, 05 May 2024 (13:18 IST)
राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यात दिल्ली -मुंबई द्रुतगती मार्गावर सकाळी झालेल्या रस्ता अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. तर दोन मुळे जखमी झाली. हे सर्व जण देवदर्शनासाठी रणथंबोर गणेश मंदिरात जात होते. या वेळी त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली .
हा अपघात सकाळी आठ वाजता बाऊनली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनास पुलाजवळ झाला. कार मध्ये असलेले प्रवाशी देवदर्शनासाठी रणथंबोर जात होते.
या दरम्यान दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची जोरदार धडक झाली आणि अपघात घडला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. आणि त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अपघाताची नोंद करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांना बाऊनलीच्या रुग्णालयात दाखल केले आहे.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.