स्वच्छ भारत अभियानांतर्गत घर तेथे शौचालय ही संकल्पना राबविण्यासाठी महापालिकेने कडक पाऊल उचलली आहेत. हे अभियान यशस्वी व्हावे आय करीता शौचालय उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह महापालिकासुद्धा अनुदान देत आहे. मात्र तरीही उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता असल्याचे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे आधार व रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे.
ही माहिती स्वच्छता विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थानी कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.