Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देश फक्त 4 लोक चालवत आहेत. 2 विकतायत तर 2 व्यक्ती खरेदी करतायत - अरुंधती राय

देश फक्त 4 लोक चालवत आहेत. 2 विकतायत तर 2 व्यक्ती खरेदी करतायत - अरुंधती राय
, शनिवार, 19 मार्च 2022 (09:08 IST)
या देशाला सध्या 4 लोक चालवत आहेत, यातील सत्तेत असलेले दोघे विकत आहेत तर दोघे हे सगळे खरेदी करत आहेत. असे म्हणत प्रसिद्ध लेखिका अरुंधती राय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली.
 
पंजाब युनिव्हर्सिटीच्या सनी ओबेरॉय ऑडिटोरियममध्ये आयोजित एका कार्यक्रमात राय बोलत होत्या. त्यांनी देशातील प्रमुख मीडियासह काही संस्थांचा दुरुपयोग होत असल्याचीही खंत व्यक्त केली. यावेळी अरुंधती राय यांनी नाव न घेता नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशातील उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

यावेळी त्या म्हणाल्या, "जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, देशातील शेतकरी आंदोलने मोठ्या प्रमाणात होत आहेत. परंतु याचे कोणाला काहीही पडलेले नाही. धार्मिकतेच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचे काम काही संस्था करत आहेत."
 
सध्या देशात जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवण्यात येत आहेत. जात, धर्म, पंथ, भाषा आणि प्रदेश यांपासून पुढे विचार करत आपण एकता जपली पाहिजे, पण सध्या देशात हे होताना दिसत नाही. असे म्हणत धार्मिक संस्था आणि संघटनांवर ही राय यांनी टीका केली
 
दरम्यान, अरुंधती राय यांच्या युनिव्हर्सिटीतील कार्यक्रमाला येण्याचा विद्यार्थीनींच्या एका गटाने विरोध केला. राय यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत या विद्यार्थीनींनी घोषणा ही दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाविकास आघाडीचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात,रावसाहेब दानवेंचा दावा