Publish Date: Thu, 24 Nov 2016 (17:13 IST)
Updated Date: Thu, 24 Nov 2016 (17:14 IST)
देशात असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरुन मालवाहतूक करणा-या तर इतर सर्व प्रवासी वाहनांना केंद्र सरकारने आणखी आठवडयाभरासाठी चांगली बातमी दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टोलमाफीची मुदत १ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.तर आता हा निर्णय आल्यावर राज्य सरकार सुद्धा लवकरच राज्यात सुद्धा ही मुदत वाढवून देणार आहे.
य अगोदर देशात राष्ट्रीय महामार्गांवरील टोलमाफी 24 नोव्हेंबरपर्यंत होती. टोलनाक्यांवर सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. त्यामुळे नागरिकांचे हाल होऊ नये या करिता आता ही बंदी सध्या तरी शिथिल केली आहे.