Publish Date: Sat, 29 Oct 2022 (20:27 IST)
Updated Date: Sat, 29 Oct 2022 (20:30 IST)
गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनला पुन्हा एकदा अपघात झाला असून, ट्रेनच्या इंजिनचे नुकसान झाले आहे. याआधी 6 आणि 7 ऑक्टोबरला सलग दोन दिवस वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अपघाताची शिकार झाली होती. पहिल्या दिवशी 6 ऑक्टोबर रोजी म्हशींच्या कळपावर धडकली, ज्यामुळे इंजिनच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी वंदे भारत एक्स्प्रेस गाडी एका गायीला धडकली, त्यामुळे ट्रेनच्या इंजिनच्या नाकाचे पॅनल खराब झाले.
आता वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे अपघाताची तिसरी वेळ आहे. भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले की, 'आज मुंबई सेंट्रलहून गांधीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ वंदे भारत एक्सप्रेस गाडी गुरांना धडकली. अपघातानंतर ट्रेन सुमारे 15 मिनिटे थांबवण्यात आली होती.
नोज पॅनेलशिवाय ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नाही.
या अपघातामुळे नोज पैनेल वगळता ट्रेनचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ट्रेन सुरळीत चालू आहे. मात्र या अपघातात एक बैल जखमी झाला.
Edited by : Smita Joshi