Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते? फार खास आहे प्रक्रिया

भारतात राष्ट्रपती निवडणूक कशी होते? फार खास आहे प्रक्रिया
भारताच्या 14व्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे, निवडणुक आयोगाने निवडणुकीसाठी तारखेची घोषणा केली आहे. 17 जुलै रोजी देशातील पुढचे राष्ट्रपतीसाठी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी मतांची मोजणी होईल.  
 
सध्याचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे कार्यकाल पुढील 25 जुलैला संपुष्टात येत आहे अशात या याच्या आधी नवीन राष्ट्रपतींची निवड होणे गरजेचे आहे. सांगायचे म्हणजे देशात राष्ट्रपतींची निवड सामान्य प्रक्रियेच्या माध्यमाने होत नाही, त्यासाठी खास प्रक्रिया केली जाते ज्याला इलेक्‍ट्रॉल कालेज म्हणतात.  
 
भारतात संसदीय लोकशाही प्रणाली अस्तित्वात असून राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे. पंतप्रधान हे कार्यकारी प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख. राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षपणे म्हणजेच लोकांचे प्रतिनिधी म्हणजे खासदार, आमदार त्यांना निवडून देत असतात. 
webdunia
पुढे बघा राष्ट्रपतींची निवड कशी होते ... 
-राष्ट्रपती निवडणुकीसाठी देशातील सर्व खासदार आणि आमदार मतदान करतात.  
-निवडणुकीत जिंकण्यासाठी एकूण 5.49 लाख मतांची गरज असते.  
-निवडणुकीत विधायक आणि संसद यांच्या मतांचे वेटेज निर्धारित असत.  
-याचे गणीत प्रत्येक राज्याची जनसंख्या आणि त्याचे ऐकून विधायकांच्या अनुपातात काढण्यात येते   
-ज्याचा हिशोब वर्ष 1971मध्ये झालेल्या जनगणने द्वारे लावण्यात येतो, जे वर्ष 2026 पर्यंत चालेल  
-अर्थात 1971 च्या जनगणनेनुसार मध्यप्रदेशाची जनसंख्या 30,017,180 होती, आणि राज्याचे एकूण विधायकांची संख्या 230 आहे.  
-आता या विधायकांच्या मतांचे गणीत काढण्यासाठी 30,017,180 च्या संख्येला 230 ने भागाकार केला जातो, जी संख्या येते त्याला पुन्हा 1000 ने भागाकार केला जातो, आणि नंतर जी संख्या येते ती त्या राज्यांच्या विधायकांच्या मतांचे मूल्य असतात.  
-या प्रकारे सर्व राज्यांच्या जनसंख्येच्या हिशोबाने प्रत्येक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या विधायकांचे वोट मूल्य निश्चित केले जातात.  
-संसदांच्या मतांचे मूल्य काढण्यासाठी देशातील सर्व विधायकांचे एकूण मूल्याने भाग केला जातो, जी संख्या निघून येते ती संसदच्या मतांचे मूल्य असतात.  
 
कशी होते वोटिंग
-देशातील इलेक्ट्रॉरल कालेजच्या एकूण सदस्यांचे कूल वोट मूल्य 10,98,882 आहे. राष्ट्रपती निवडणुकीत जिंकण्यासाठी 5,49,442 मतांची गरज असते.  
-वोटिंगच्या दरम्यान प्रत्येक सदस्याला बॅलेट पेपरवर पहिले दुसरे आणि तिसरे आवडीच्या उमेदवाराची माहिती द्यायची असते.  
-त्यानंतर प्रथम अग्रक्रमांकांचे मत मोजण्यात येतात, या प्रक्रियेत जर निर्धारित 5,49,442 मतांची संख्या पूर्ण होते तर निवडणुक पूर्ण मानला जातो आणि जर पहिल्या अग्रक्रमांकांचे मत पूर्ण पडत नाही तर दुसर्‍या अग्रक्रमांकांच्या मतांची मोजणी होते.  
webdunia
काय आहे सध्याच्या पक्षांचे गणीत  
-सध्याच्या निवडणुकीत एकूण 4120 विधायक आणि लोकसभा-राज्यसभांचे 776 संसद वोट देतील.  
-सध्या केंद्रात सत्तारूढ एनडीएचे संसद आणि विधायकांचे एकूण 532019 वोट आहे.   
-जिंकण्यासाठी त्याला एकूण 549442 मतांची गरज आहे ज्यात त्यांच्याजवळ 17423 वोट कमी आहे.  
-भाजपने म्हणून आपले  संसद योगी आदित्यनाथ, केशव प्रसाद मौर्या आणि गोव्याचे सीएम राहून चुकलेले मनोहर पार्रिकर यांचा राजीनामा संसदेने करवला नाही आहे ज्याने गरज पडल्यास त्यांचे मत देखील कामात येऊ शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रपती निवडणूक : भुजबळ, कदम करणार मतदान