Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डी कंपनीला मुळासकट संपवा : सुषमा स्वराज

डी कंपनीला मुळासकट संपवा : सुषमा स्वराज
दिल्ली , बुधवार, 31 ऑगस्ट 2016 (12:29 IST)
पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि डी कंपनीला मुळासकट संपवावं. शिवाय मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा केल्यानंतरच भारत-पाकमध्ये चर्चा शक्य असल्याचं सुषमा स्वराज यांनी अमेरिका आणि भारताच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींसमोर पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं आहे. कराचीत असलेला दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईदवर पाकिस्ताननं कारवाई करावी अशी मागणीही स्वराज यांनी केली. दरम्यान, जॉन केरी यांनीही पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्याचा इशारा दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अॅट्रॉसिटी अंतर्गत शरद पवारांविरोधात गुन्हा नोंदवा!