नवी दिल्ली- सरकारने भारतीय लष्कराने पाकवप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर नौदलाला अँलर्ट राहण्याचे आदेश दिले असून महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये सरकारने नौदलाला अधिक अँलर्ट राहण्यास सांगितले आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नौदलाला इतर ऑपरेशन रोखण्यास सरकारने सांगितले असून 1 आणि 2 ऑक्टोबरला एनसीसी कॅडेट आणि लष्काराच्या शाळेतील मुलांना देखील समुद्रापासून दूर राहण्यास सांगितले आहे. यासोबतच नागरिकांना देखील समुद्रापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत.