Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिहारात नक्षली हल्ल्यात 10 जवान शहीद

बिहारात नक्षली हल्ल्यात 10 जवान शहीद
औरंगाबाद- बिहारमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. येथील गया व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्लत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) दहा जवान शहीद झाले आहेत. तर, चार जखमी झाले आहेत. हे सर्व जवान सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनचे होते. सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तीन नक्षलवादीही मारले गेल्याचे वृत्त आहे.
 
सीआरपीएफच्या जवानांनी 16 जुलैपासून गया व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमाभागात शोधमोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरू असतानाच काल रात्री अकराच्या सुमारास नक्षलवादी व जवान समोरासमोर आले. नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला करण्याची तयारी आधीच केली होती. सुरक्षा दलाचे जवान डुमरी नाला इथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या जवानांवर गोळीबार केला, नंतर तब्बल 30 भू-सुरुंग स्फोट घडवून आणले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हे आहे भारतातील सर्वात अमीर भिकारी, ज्यांच्याजवळ आहे लाखोंचे फ्लॅट आणि...