Publish Date: Wed, 19 Nov 2014 (11:47 IST)
Updated Date: Wed, 19 Nov 2014 (11:49 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशवार्यांवर आणि तेथील भाषणांच्या प्रसिद्धीवर राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी जोरदार तोंडसुख घेतले आहे. मोदी सध्या एनआरआय बनले आहेत, असा टोलाच लालूंनी लगावला आहे. विदेशात मोदींचा डंका नाही तर आपली हवा निघाली आहे, असेही लालू म्हणाले. मोदी यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जागतिक स्तरावर भारताचा नारा बुलंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या सहा महिन्यात भूतान, नेपाळ, ब्राझील, अमोरिका, जपान, म्यानमार असे दौरे करणारे मोदी सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहेत. मोदींच्या याच परदेशवार्यांच्या पार्श्वभूमीवर लालूंनी आपल्या खास शैलीत टीका केली आहे. ‘मोदींच्या दौर्यांचा केवळ टीव्हीच्या माध्यमातून प्रचार-प्रसार केला जात आहे.