संसदेच अर्थसंकल्पी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला. विरोधी पक्षाने घेतलेल आक्रमक पवित्रमुळे तसेच राजकीय कारणांमुळे जीएसटी सारखे विधेयक अडकून पडले. सरकारने हे विधेयक मंजूर न झाल्यामुळे काँग्रेसला जबाबदार धरले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुक्तार अब्बास नक्वी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, या अधिवेशनात ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा दोन्ही सभागृहात गाजला. अनेकवेळा लोकसभेचे कामकाज विस्कळीत झाले. राज्यभाही अनेकवेळा विस्कळीत झालमुळे 19 तास वाया गेले. तरीही राज्सभेत 12 विधेयके मंजूर करण्यात झाली. या अर्थसंकल्पी अधिवेशनाला 25 एप्रिल रोजी प्रारंभ झाला होता.