देशाची सुरक्षा वेगळी नी राजकारण वेगळे आहे. आम्ही कधी सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण केलं नाही. पण भाजपने जणू सीमेवर जाऊन आम्हीच सर्जिकल स्ट्राईक केला असा गावभर गवगवा का करत आहे हे मात्र आम्हला कळत नाही त्याचे स्वतःच्या फायद्यासाठी असा उपयोग आम्ही पहिले असा सरळ प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला विचारला आहे.. तसंच मराठा मोर्चा हा आमच्या विरोधात नाही तर भाजप सरकार विरोधात आहे.
जेव्हा युपीए होते तव्हा मी संरक्षण मंत्री होतो त्यामुळे मला माहिती आहे. मनमोहन सिंह पंतप्रधान असतांना चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केले. कारण काही गोष्टीबाहेर सांगायच्या हे सुद्धा कळत नाही. तर जे केलय ते आज भाजपचे नेते गावभर सांगत फिरत आहेत, जणू काही यांनीच पाकिस्तानच्या सीमेत जाऊन सर्जिकल स्ट्राईक केले असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नागपूर विभागीय पदाधिका•यांचा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला आहे.