Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Meghalaya Tourism : मेघालयातील उमियाम या रहस्यमयी सरोवराला 'अश्रूंचे पाणी' का म्हटले जाते?

Umiam lake Meghalaya
भारतात अशी अनेक ठिकाणे आहे जी त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी तसेच मनोरंजक कथांसाठी ओळखली जातात. यापैकीच एक म्हणजे उमियाम सरोवर, जे 'अश्रूंचे पाणी' म्हणून ओळखले जाते. हे सरोवर त्याच्या सौंदर्यासाठी आणि शांत परिसरासाठी जगभरात प्रसिद्ध आहे, परंतु त्याच्या नावामागील कथा त्याला आणखी खास बनवते.
ALSO READ: भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला कुठे आहे? ज्यात अनेक रहस्ये दडलेली आहे
उमियाम हे नाव खासी भाषेतून आले आहे, जिथे 'उम' म्हणजे पाणी आणि 'इयम' म्हणजे अश्रू. म्हणूनच याला 'अश्रूंचे पाणी' म्हटले जाते. यामागे एक लोकप्रिय लोककथा देखील आहे. असे मानले जाते की दोन बहिणी स्वर्गातून पृथ्वीवर उतरल्या, परंतु त्यापैकी एक वाटेत हरवली. दुसऱ्या बहिणीने तिचा शोध घेतला पण ती तिला सापडली नाही. दुःखात ती इतकी रडली की तिच्या अश्रूंनी हे सरोवर तयार झाले. म्हणूनच हे सरोवर या नावाने ओळखले जाते. स्थानिक लोक याला 'बारपाणी' असेही म्हणतात, ज्याचा अर्थ 'मोठे पाणी' असा होतो.
ALSO READ: Adventure Games हे साहसी खेळ अगदी कोणत्याही वयात अनुभवता येतात
हे सुंदर सरोवर मेघालय राज्यात, शिलाँगपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. येथील हिरवीगार वनराई, पर्वतांची दृश्ये आणि स्वच्छ पाणी याला अत्यंत आकर्षक बनवतात. म्हणूनच दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. येथील शांत वातावरण आणि थंडगार वारा एक सुखद अनुभव देतात.

उमियाम सरोवराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते एप्रिल हा सर्वोत्तम काळ आहे, कारण या काळात पाऊस कमी असतो. तथापि, ज्यांना पाऊस आवडतो ते पावसाळ्यातही भेट देऊ शकतात, कारण तेव्हाही हे ठिकाण अत्यंत सुंदर असते.
ALSO READ: एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रस्ते अपघातात अभिनेते संतोष नायर यांचे निधन