Publish Date: Thu, 17 Feb 2022 (15:45 IST)
Updated Date: Sat, 08 Oct 2022 (13:45 IST)
पंजाबमध्ये निवडणुकीचेे वातावरण शिगेला पोहोचला आहे. ही लढत आता अंतिम टप्प्यात आहे. अशात काँग्रेससमोर स्वत:ला सत्तेत ठेवण्याचे मोठे आव्हान आहे म्हणून प्रियंका गांधी यांनी आज पठाणकोटमध्ये प्रचार केल्यानंतर रॅलीला संबोधित केले. यावेळी प्रियांकाने पीएम मोदी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या की बडे मियाँ ते बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. येथे त्यांनी मोदींना मोठे मिया तर केजरीवाल यांना छोटे मिया असे म्हटले.
प्रियंका म्हणाल्या की पीएम मोदींनी 15 लाख देण्याचे आश्वासन दिले होते आणि आता केजरीवाल 7 लाखांचा फायदा होईल असे सांगत आहेत. बडे मियाँ ते बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह.
दिल्लीतील सरकार अरविंद केजरीवाल चालवत नाहीये तर इथे येऊन आम्ही नवे सरकार स्थापन करू असे सांगत आहेत. लहान मिया दहशतवाद्यांच्या घरात राहतात आणि मोठे मिया शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतात. त्या म्हणाल्या की लॉकडाऊनच्या वेळी भाजप सरकारकडून कोणताही दिलासा मिळाला नाही आणि दिल्लीतही या काळात लोक रस्त्यावर मरताना दिसले.
प्रियांका यांनी चन्नी सरकारचे कौतुक केले आणि म्हणाल्या की देशातील कोणतेही सरकार दाखवा ज्यांनी 111 दिवसांत चन्नी सरकारने केले इतके काम केले असतील तर. या 111 दिवसांत चन्नी यांनी अनेक ठोस निर्णय घेतले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले, वीज माफ झाली, ग्रामीण भागात पाण्याचे दर 50 पर्यंत कमी केले.
त्याचबरोबर काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास पक्षाच्या महिलांना सरकारी बसमध्ये मोफत प्रवास मिळेल, असे त्यांनी यावेेेळी सांगितले.