कणेरी मठ येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवात ‘युवा ज्ञानोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर होते. रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘सध्याचा युवक आपल्यापुढे आदर्श नाही, असे सांगत असतो. पण, राम, कृष्ण, अर्जुन, विवेकानंद हे सर्व तरुण होते. त्यांनी अत्याचारी राक्षसांचा नाश केला. त्यांचा आदर्श समोर असताना असा विचार मनात येतोच कसा. छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, भगतसिंग यांची चित्रे घरात लावा. केवळ इतिहासातूनच प्रेरणा घेण्यापेक्षा स्वत: वेगळा इतिहास निर्माण करा. आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म हा नशिबाने मिळालेला आहे. त्यामुळे जे काही प्राणपणाने करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा.’