विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्याच्या जनतेने स्वच्छ, चारित्र्यशील उमेदवाराला मते द्यावीत, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले आहे. तसेच पर्यांयापैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर, सरळ 'नोटा'ला मते द्या, मात्र, मतदानानाचा हक्क आवर्जून बजावा, असेही अण्णा यांनी म्हटले आहे.
आळंदीमध्ये अण्णांनी पत्रकारांशी संवाद साधला. अण्णा भक्तीगीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यासाठी आले होते. मतदारांनी पैसे घेऊन मत देणे थांबवावे, हा एका पद्धतीने लोकशाहीचा लिलाव असल्याची खंत अण्णांनी व्यक्त केली आहे.