Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणेशोत्सवासाठी कोकणात विनाटोल गाड्या!

गणेशोत्सवासाठी कोकणात विनाटोल गाड्या!
मुंबई , शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (11:46 IST)
पुणेमार्गे कोकणात जाणाऱ्यांना टोलमधून सूट देण्याची मागणी नितेश राणेंनी केली होती. मात्र ती सरकारने धुडकावून लावली. त्यानंतर स्वाभिमानने थेट रस्त्यावर उतरुन विनाटोल गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानचे कार्यकर्ते खालापूर टोलनाक्यावर उपस्थित राहून कोकणात जाणाऱ्या गाड्यांना विनाटोल सोडत आहेत.

राज्य सरकार कोकणी माणसावर अन्याय करत आहे. स्वाभिमानचे कार्यकर्ते 4 सप्टेंबरपर्यंत खालापूर, लोणावळा या टोलनाक्यांपासून कोल्हापूरपर्यंत उभे राहून कोकणात जाणाऱ्या वाहनांना विनाटोल पाठवणार आहेत. यामुळे तरी राज्य सरकारला जाग येईल आणि टोलमुक्तीसाठी पुढाकार घेईल, असे नितेश राणे म्हणाले विनाटोलसाठी तुमच्या गाडीवर फक्त कोकणात जात असल्याचं पोस्टर किंवा स्टिकर लावलेलं पाहिजे, असे राणे यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बनावट कागदपत्रं सादर करुन लष्कर भरती!