Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जे रावण आहेत, तंचा विनाश अटळ : राधे माँ

जे रावण आहेत, तंचा विनाश अटळ : राधे माँ
मुंबई , सोमवार, 10 ऑगस्ट 2015 (12:02 IST)
माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. जे माझ्या विरोधात कटकारस्थान करत आहेत. जे रावणासारखे वागत आहेत त्यांचा विनाश अटळ आहे, अशी प्रतिक्रिया देत राधे माँ यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
 
राधे माँ यांच्याविरोधात बोरिवली पोलीस ठाण्यात निक्की गुप्ता या महिलेने हुंडय़ासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी राधे माँ यांच्यासह निक्की गुप्ता यांच्या कुटुंबातील पाचजणांना समन्स बजावले आहे. या पाचही जणांचे जबाब नोंदविण्यात आल्यानंतर राधे माँ यांनाही पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राधे माँ यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मी निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
 
मी कोणताही गुन्हा केलेला नाही. माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असेल तर त्याबाबत मला काहीही माहित नाही. कोणी कितीही म्हटले तरी माझ्या नजरेतून, ईश्वराच्या नजरेतून पाहिल्यास मी निदरेष आहे. जे माझ्यावर प्रेम करतात, जे माझे खरे भक्त आहेत त्यांच्या दृष्टीने मी योग्यच आहे, असे राधे माँ यांनी नमूद केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi